चालू घडामोडी : 01 फेब्रुवारी 2020
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 01 Februar 2020 | चालू घडामोडी : 01 फेब्रुवारी 2020
चालू घडामोडी – राणी रामपालला ‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अॅथलीट’चा पुरस्कार
- भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिला या वर्षीचा प्रतिष्ठेचा ‘वर्ल्ड गेम्स सर्वोत्तम अॅथलीट’चा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार पटकावणारी राणी रामपाल ही पहिली हॉकी खेळाडू ठरली आहे.
- चाहत्यांकडून गेली २० दिवस मते मागवण्यात आल्यानंतर वर्ल्ड गेम्सने गुरुवारी पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. ‘‘राणीला वर्ल्ड गेम्सचा सर्वोत्तम अॅथलीटचा पुरस्कार जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. राणीने तब्बल १ लाख, ९९ हजार, ४७७ मते मिळवत या पुरस्काराच्या शर्यतीत अग्रस्थान पटकावले. जगभरातील ७ लाख, ५ हजार, ६१० चाहत्यांनी आपल्या आवडत्या खेळाडूंना मते दिली होती,’’ असे ‘वर्ल्ड गेम्स’च्या पत्रकात म्हटले आहे.
- ‘‘संपूर्ण हॉकीक्षेत्राला, भारताला तसेच माझ्या संघसहकाऱ्यांना मी हा पुरस्कार समर्पित करते. चाहते, प्रशिक्षक, भारत सरकार यांच्या पाठिंब्यामुळेच हे यश मिळवू शकले. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने या पुरस्कारासाठी माझी शिफारस केल्याने त्यांचेही खूप खूप आभार,’’ असे राणीने सांगितले.
[irp]
चालू घडामोडी – Budget 2020 : येत्या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 6 ते 6.5 टक्के राहणार, आर्थिक सर्व्हे सादर
- देशावर दाटलेल्या मंदीच्या सावटाच्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा 2019-20 चा आर्थिक सर्व्हे अहवाल संसदेसमोर मांडला.
- देशावर दाटलेल्या मंदीच्या सावटाच्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा 2019-20 चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेसमोर मांडला.
- या सर्व्हेनुसार 2019-20 या सरत्या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 5 टक्के राहिला आहे. तर 2020-21 या आगामी आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 6 ते 6.50 टक्के राहील, असा अंदाज वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे.
- आगामी आर्थिक वर्षातील विकारदराबाबतच्या अंदाजामध्ये चालू आर्थिक वर्षापेक्षा 0.5 ते 1 टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. तर चालू आर्थिक वर्षासाठी विकासदराचा अंदाज हा 5 टक्के एवढा वर्तवण्यात आला आहे. तर वित्तीय वाढ ही 5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- वित्तमंत्र्यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार केंद्र सरकार 2020 ते 2025 या आर्थिक वर्षांमध्ये इंफ्रा सेक्टरमध्ये 102 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
- पुढच्या तीन वर्षांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात 1.4 ट्रिलीयन डॉलर म्हणजेच 100 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची गरज आहे, असा सल्लाही या सर्वेमधून देण्यात आला आहे.
- 2018-19 या आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेने 120 कोटी टन मालाची वाहतून केली. त्याबरोबरच भारतीय रेल्वे जगातील चोथी सर्वात मोठी मालवाहक बनली.
[irp]
चालू घडामोडी – परदेशातील प्रख्यात मल्टिनॅशनल कंपन्यांचं नेतृत्व करणाऱ्या भारतीयांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे.
- मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला,
- गगल आणि अल्फाबेटचे CEO सुंदर पिचाई,
- मास्टरकार्डचे CEO अजय बांगा,
- पप्सीकोचे CEO इंद्रा नुयी आणि
- अडॉबचे CEO शंतनू नारायण यांच्या पंक्तीत आता आणखी एक भारतीय जाऊन बसणार आहे.
- अमेरिकेतील नामांकित इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स (IBM) या कंपनीच्या CEO पदावर अरविंद कृष्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे
अरविंद कृष्णा
- अरविंद कृष्णा जरी अमेरिकेतील महत्त्वाची कंपनी असणाऱ्या IBM च्या मुख्य पदावर पोहोचले असले तरी त्यांची भारताशी नाळ जोडलेली आहे. IIT कानपूरचे ते पदवीधर आहेत.
- तयाचप्रमाणे त्यांनी युनिवर्सिटी ऑफ इलनॉइज, अर्बाना-शँपेनमधून पीएचडी पूर्ण केली आहे. एक प्रभावी ऑपरेशनल लीडर म्हणून कृष्णा यांच्याकडे पाहिलं जातं.
- IIT कानपूर आणि इलनॉइज विद्यापीठाचे माजी विद्यार्थी म्हणून कृष्णा यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याचप्रमाणे 15 पेटंट्सचे ते सह-लेखक.
- IEEE आणि ACM जरनल्सचे संपादक आहेत.
[irp]
चालू घडामोडी – ठाकरे सरकार आणणार मुस्लीम आरक्षण
- उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावर आता मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा आहे.
- नोकरी आणि शिक्षणात मुस्लिमांना आरक्षण देणारा कायदा करण्यासाठी लवकरच विधेयक मांडण्यात येणार आहे. ठाकरे सरकारमधले मंत्री आणि काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनीच याविषयी गौप्यस्फोट केला आहे.
- एकीकडे सुधारित नागरिकत्व कायदा राज्य सरकारने विरोध दाखवल्यानंतर आता मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा राज्यात पुढे रेटण्यात येणार आहे.
- हा मुद्दा आमच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग होता आणि आम्ही लवकरात लवकर यावर निर्णय घेऊ, असं काँग्रेस आमदार अस्लम शेख म्हणाले आहेत.
- 2014 ला भाजप- शिवसेना सरकार येण्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने राज्यात मराठा आरक्षण आणि मुस्लीम आरक्षण आणण्याविषयी ठराव संमत केला होता.
- दरम्यान सत्तापालट झाले. सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला, पण मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा तसाच राहिला.
# Current Affairs
[irp]
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents