राजर्षि शाहू महाराज
· जन्म – 16 जुलै 1874.
· मृत्यू – 6 मे 1922.
· एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल करण्यात आली.
· महाराष्ट्रात त्यांच्या शेतकर्यांचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला.
· भारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.
· संस्थात्मक योगदान :
· ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार्या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.
· 1901 – मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).
· नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.
· 1902 – राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.
· 15 नोव्हेंबर 1906 – किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.
· 1907 – मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.
· 1911 – जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.
· 1911 – शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.
· 1917 – माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
· 14 फेब्रुवारी 1919 – पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.
· लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.
· पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.
· जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.
· 1894 – बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.
· 1917 – विधवा विवाहाचा कायदा.
· 1918 – आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.
· 1918 – महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या.
· वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली.
· 1920 – माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन.
· 1895 – गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी.
· 1899 – वेदोक्त प्रकरण – सत्यशोधक चळवळीचे ब्राह्यणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास करणीभूत.
· यामुळे पुरोहितगिरी व ब्राम्हंणाच्या मक्तेदारीस शह.
· 1906 – शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना.
· 1907 – सरकारी तत्वावर कापड गिरणी मल्लविधेस प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुत्स्यांचे मैदान.
· 1911 – सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली.
· 1911 – भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले.
· 1912 – कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन.
· 1916 – निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना.
· 1918 – कुलकर्णी वेतणे रद्द. तलाठी नेमले.
· 1918 – आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले.
· 1919 – स्त्रियांना क्रूरपणे वागविन्यास प्रतिबंध करणारा कायदा.
· 1920 – घटस्फोटाचा कायदा. देवदासी प्रथा कायद्याने बंद.
· 1920 – हुबळी येथील ब्राह्येनेत्तर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.
· कोल्हापूर शहरास ‘वस्तीगृहांची जननी‘ म्हटले जाते.
· ब्राम्ह्येणत्तर चळवळीचे नेतृत्व.
· वैशिष्टे :
· महात्मा फुले व सत्यशोधक समाजाचा प्रारंभ.
· सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील म. फुले यांचे खरेखरे वारसदार.
· जाती भेदास तीव्र विरोध, लोककल्याणकारी राज्य.
· पददलित व मागास वर्गीयांची उन्नती हेच जीवन कार्य.
· उदार विचार प्रणालीचा राजा.
· राज्य सोडावे लागले तर बेहत्तर, पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत सोडणार नाही.
· कामगारांनो संघटित व्हा व आपले हक्क प्राप्त करून घ्या, हा संदेश.
उल्लेख.:-
· He Was a King But a Democratic King – भाई माधवराव बागल.
· शाहू राजा नुसता मराठा नव्हता, तो नव्या युगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होता. – वि. रा. शिंदे.
· टीकाकारांकडून ‘शुद्रांचा राजा‘ असा उल्लेख.