११ सप्टेंबर दिनविशेष
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
११ सप्टेंबर दिनविशेष
२००१ : अमेरिकेत ठिकठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २९९६ लोक ठार झाले. यावेळी अध्यक्ष जॉर्ज बुश यांना तातडीने अज्ञातस्थळी हलवले गेले. अमेरिकेचे जर एखाद्या देशाशी अणूयुद्ध झालेच तर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षिततेसाठी अमेरिकेत ७५ हून अधिक ठिकाणी जमिनीखाली विषेश व्यवस्था तयार ठेवण्यात आलेली आहे. पेंटॅगॉन या अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात सुमारे दहा कोटी डॉलरचे नुकसान झाले.
१९७२ : नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित ’तरुण तुर्क, म्हातारे अर्क’ या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला. थिएटरमधील पहिला प्रयोग ५ आक्टोबर १९७२ रोजी मुंबईच्या रविंद्र नाट्यमंदिरात झाला.
१९६५ : भारत पाक युद्ध – भारतीय सैन्याने लाहोरजवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.
१९६१ : ’विश्व प्रकृती निधी’ (World Wildlife Fund) ची स्थापना झाली.
१९१९ : अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.
१८९३ : स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
आत्माराम रावजी देशपांडे तथा ‘कवी अनिल
१९१७ : फर्डिनांड मार्कोस – फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २८ सप्टेंबर १९८९)
१९१५ : पुपुल जयकर – सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या (मृत्यू: २९ मार्च १९९७)
१९०१ : आत्माराम रावजी देशपांडे तथा ‘कवी अनिल’ – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, साहित्य संमेलनाचे व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, ’प्रेम आणि जीवन’, ’ भग्नमूर्ती’, ’चिनी मुलास’, ’निर्वासित’ ही खंडकाव्ये प्रसिद्ध आहेत. प्रौढ शिक्षणविषयक कार्यासाठी त्यांना नेहरू पारितोषिक मिळाले होते. (मृत्यू: ८ मे १९८२)
१८९५ : आचार्य विनोबा भावे – भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य, भारतरत्न – १९८३ मरणोत्तर, १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९८२)
१८८५ : डी. एच. लॉरेन्स – इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार, टीकाकार आणि चित्रकार (मृत्यू: २ मार्च १९३०)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
गजानन माधव मुक्तिबोध१९९८ : क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक (जन्म: १० आक्टोबर १९०९ – अहमदनगर, महाराष्ट्र)
१९८७ : महादेवी वर्मा – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, प्रयाग महिला विद्यापीठाच्या प्राचार्या (१९३३) व कुलगुरू, ’यामा’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. (जन्म: २६ मार्च १९०७)
१९७१ : निकिता क्रूश्चेव्ह – सोविएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १५ एप्रिल १८९४)
१९६४ : गजानन माधव मुक्तिबोध – हिन्दी कवी, लेखक, टीकाकार व संपादक (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)
१९४८ : बॅ. मुहम्मद अली जिना – पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल (जन्म: २५ डिसेंबर १८७६)
१९२१ : सुब्रम्हण्यम भारती – तामिळ साहित्यिक (जन्म: ११ डिसेंबर १८८२)
![]()



