दिनविशेष : २३ ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मुलन दिन

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
125

23 ऑगस्ट    : जन्म

१७५४: फ्रान्सचा राजा लुई (सोळावा) यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १७९३)

१८५२: भारतीय वैद्य आणि दानकर्ते राधा गोबिंद कार यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९१८)

१८७२: भारतीय वकील आणि राजकारणी तांगुतरी प्रकाशम यांचा जन्म. (मृत्यू: २० मे १९५७)

१८९०: न्यूज-डे चे सहसंस्थापक हॅरी फ्रँक गग्नेहॅम यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७१)

१९१८: श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर उर्फ गोविंद विनायक करंदीकर यांचा धालगल सिंधुदुर्ग येथे जन्म. (मृत्यू: १४ मार्च २०१०)

१९४४: चित्रपट अभिनेत्री सायरा बानू यांचा जन्म.

१९५१: जॉर्डनची राणी नूर यांचा जन्म.

१९७३: मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरा खान यांचा जन्म.

 

२३ ऑगस्ट   : मृत्यू

६३४: अबू बकर अरब खलिफा यांचे निधन.

१३६३: डहाण राजवटीचे संस्थापक चेन ओंलियांग यांचे निधन.

१८०६: फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स कुलोम यांचे निधन. (जन्म: १४ जून १७३६)

१८९२: ब्राझीलचे पहिले अध्यक्ष डियोडोरो डा फोन्सेका यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १८२७)

१९७१: मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांचे निधन. (जन्म: २४ जानेवारी १९२४)

१९७४: मराठी ग्रंथकार आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १८९७)

१९७५: नामवंत शास्त्रीय गायक, गुरू, संगीतप्रसारक व अभिनेते पं. विनायकराव पटवर्धन यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १८९८)

१९९४: इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतणपटू आरती साहा यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९४०)

१९९७: ग्रेनाडा चे पहिले पंतप्रधान एरिक गेयरी यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १९२२)

२०१३: आर.जे. कॉमन रेल्वेमार्ग गटाचे संस्थापक रिचर्ड जे. कॉर्मन यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९५५)

२३ ऑगस्ट   : महत्वाच्या घटना

१८३९: युनायटेड किंगडमने हाँगकाँगचा ताबा घेतला.

१९१४: पहिले महायुद्ध – जपानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

१९४२: मो. ग. रांगणेकर यांच्या कुलवधू नाटकाचा पहिला प्रयोग.

१९४२: दुसरे महायुद्ध – स्टालिन ग्राडची लढाई सुरू.

१९६६: लुनार ऑर्बिटर-१ या मानवरहित अंतराळयानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे काढली.

१९९०: आर्मेनिया सोव्हिएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

१९९१: वर्ल्ड वाईड वेब सार्वजनिक उपयोगासाठी सुरु झाले.

१९९७: हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला. एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे.

२००५: कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.

२०११: लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफीची सत्ता संपुष्टात.

२०१२: राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार.

 

निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम