दिनविशेष :८ ऑगस्ट – भारतीय स्वतंत्र चळवळीचा क्रांतिदिन.

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
121

 8 ऑगस्ट : जन्म

१०७८: जपानी सम्राट होरिकावा यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट ११०७)

१८७९: अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस चे सहसंस्थापक डॉ. बॉब स्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९५०)

१९०२: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ पॉल डायरॅक यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १९८४)

१९१२: जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९९८)

१९१२: कोल्हापूरची कलापरंपरा जपणारे चित्र व शिल्पकलेतील दिग्गज तुकाराम केरबा ऊर्फ टी. के. अण्णा वडणगेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००४)

१९२५: शास्त्र व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु पद्मश्री डॉ. वि. ग. भिडे यांचा जन्म.

१९२६: साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि बालभारती चे संपादक शंकर पाटील यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९४)

१९३२: अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक दादा कोंडके यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १९९८)

१९३४: भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक शरत पुजारी यांचा जन्म. (मृत्यू: १२ मे २०१४)

१९४०: क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै २००७)

१९५०:  प्लेस्टेशन चे निर्माते केन कुटारगी यांचा जन्म.

१९५२: भारतीय क्रिकेटपटू सुधाकर राव यांचा जन्म.

१९६८: भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक ऍबे कुरिविला यांचा जन्म.

१९८१: स्विस लॉन टेनिस खेळाडू रॉजर फेडरर यांचा जन्म.

8 ऑगस्ट   : मृत्यू

१८२७: ब्रिटनचे पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १७७०)

१८९७: जर्मन रसायनशास्त्रज्ञ व्हिक्टर मेयर यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १८४८)

१९९८: लेखिका व कादंबरीकार डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांचे निधन.

१९९९: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक गजानन नरहर सरपोतदार यांचे निधन.

 

8 ऑगस्ट   : महत्वाच्या घटना

१५०९: कृष्णदेव राय हे विजयनगर चे सम्राट बनले.

१९४२: क्रांतिदिन. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून सुरु झाले.

१९४२: चले जाव चा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.

१६४८: स्वराज्याची पहिली लढाई – पुणे सातारा मार्गावरील खळत-बैलसरच्या लढाईत आदिलशहाचा सरदार फत्तेहखानाच्या फौजेचा शिवाजीराजांनी सपशेल पराभव केला.

१९०८: विलब राइट यांनी पहिले उड्डाण केले.

१९४२: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात चले जाव चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला.

१९६३: इंग्लंडमधे १५ जणांच्या टोळीने रेल्वेवर दरोडा टाकुन २६ लाख पौन्ड पळवले.

१९६७: इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाइन्स, सिंगापूर व थायलँड यांनी ASEAN ची स्थापना केली.

१९८५: भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी कार्यान्वित झाली.

१९९४: पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सुरू केले.

१९९८: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.

२०००: महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा महाकवी कालिदास संस्कृत-साधना पुरस्कार पुण्याचे वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांना जाहीर.

२००८: चीनमधील बिंजिंग येथे येथे २९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

 

निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम