चालू घडामोडी : 28 October 2019
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
भारत, नेपाळ, भूतान या देशांच्या सीमेवर ‘वन्यजीवन संरक्षण उद्यान’ तयार करण्याची योजना
- सीमेवरील वन्यजीवन संरक्षण ‘शांती उद्यान’ तयार करण्यासाठी भारत, नेपाळ आणि भूतान या देशांनी एक योजना तयार केली आहे आणि त्याच्या संदर्भात एका सामंजस्य कराराचा मसुदा तयार करण्यात आला आहे.
- भारताच्या पुढाकाराने इतर दोन्ही देशांनी प्रस्तावित उद्यानात तीन देशांच्या लगतच्या परिसरातल्या समृद्ध जैवविविधतेचा समावेश असणार आहे
- या परिसरात असलेल्या वन्यप्राण्यांना स्थलांतरणासाठी अधिक क्षेत्र उपलब्ध व्हावे आणि त्यात कोणतीही कायदेशीर अडचण निर्माण व्हावी नाही यासाठी हा कायदा वन्यजीवांच्या संरक्षणार्थ अधिक फायदेशीर ठरणार आहे.
- भारत आणि भूतान या देशांच्यामध्ये यापूर्वीच एक वन संरक्षित क्षेत्र असून त्यामध्ये आसाम राज्यामध्ये असलेल्या मानस राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. नवीन त्रिपक्षीय प्रकल्पामुळे हा मानस राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार ठरणार आहे
संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक अन्न कार्यक्रमाने (UNWFP) – कुपोषणाच्या विरोधात ‘फीड अवर फ्यूचर’ मोहीमेचा प्रारंभ
- जागतिक अन्न दिनानिमित्त २१ ऑक्टोबर२०१९ रोजी भारतात उपासमार व कुपोषण या गंभीर बाबींविषयी जागृती निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक अन्न कार्यक्रमाने (UNWFP) ‘फीड अवर फ्यूचर’ नावाच्या सिनेमा जाहिरात मोहीमेचा प्रारंभ केला आहे.
- या मोहिमेच्या प्रारंभामध्ये टीव्ही होस्ट मिनी माथुर यांच्याकडून संचालित सिनेमा आणि सामाजिक परिवर्तनाबद्दल चर्चासत्र आयोजित केले जाणार.
- शून्य उपासमारीचे जग तयार करण्याच्या उद्देशाने UFO मूव्हीज संस्थेच्या पाठिंब्याने हे अभियान चालवले जाणार आहे.
- WFPचे ‘शेयर द मील’ हे जागतिक उपासमारी विरोधातले जगातले पहिले मोबाइल अॅप जाहीर करण्यात आले आहे.
- अॅप वापरकर्त्यांना लहान देणग्या देता येणार आणि त्यातल्या प्रगतीचा मागोवा घेण्यास सक्षम करते
- २०१८ साली फेसबुक, ग्लोबल सिनेमा अॅडव्हर्टायझिंग असोसिएशन (SAWA) आणि WFP यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचा प्रारंभ केला.
United Nations World Food Program [UNWFP]
- संस्थेची स्थापना १९ डिसेंबर १९६१ रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय रोम (इटली) येथे आहे.
- संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक अन्न कार्यक्रम (UNWFP) ही अन्न-पुरवठा संदर्भात सहाय्य करणारी संयुक्त राष्ट्रसंघाची (UN) एक शाखा असून ती जगातली सर्वात मोठी मानवतावादी संघटना आहे जी उपासमारी व अन्न सुरक्षा अश्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देते.
- संस्था दरवर्षी ८३ देशांमधल्या सरासरी ९१.४ दशलक्ष लोकांना अन्न पुरवठा करून मदत करते.
- ही संस्था अशा लोकांना मदत करते जे स्वत: आणि त्यांच्या कुटुंबासाठी पुरेसे अन्न मिळवू शकत नाहीत.
- ही संस्था संयुक्त राष्ट्रसंघ विकास गटाची (UNDG) सदस्य आणि त्याच्या कार्यकारी समितीचा एक भाग आहे.
![]()



