health recruitment 2021 | मोठी बातमी ! आरोग्य विभागाची भरती पुढे ढकलली ! तांत्रिक अडचणींमुळे राज्य सरकारचा निर्णय, विद्यार्थांमध्ये गोंधळ
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मुंबई : येत्या 26 सप्टेंबर रोजी होणारी आरोग्य विभागाची भरती परीक्षा (health department recruitment 2021 exam) पुढे ढकलण्यात आली आहे. सातत्याने उद्भवणाऱ्या तांत्रिक चुकांमुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली आहे. विशेष म्हणजे काही परीक्षार्थी आपापल्या परीक्षा केंद्रावर जाऊन पोहोचले आहेत. असे असताना ऐनवेळी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे आता चांगलाच गोंधळ उडाला आहे. परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागत असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. (maharashtra government cm uddhav thackeray and rajesh tope postponed maharashtra health department recruitment 2021 exam)
मेसेजद्वारे आरोग्य विभागाचा निरोप कळवला
आरोग्य विभागातर्फे घेण्यात येणारी परीक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. परीक्षेसाठी उमेदवारांनी पूर्णपणे तयारी केली होती. मात्र ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय आज अचानकपणे घेण्यात आला आहे. ही परीक्षा पुन्हा कधी घेण्यात येईल, याबाबत सध्यातरी कोणतीही माहिती देण्याता आली नाही. मात्र, परीक्षार्थिंना मेसेजद्वारे हा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. परीक्षा दोन दिवसांवर असताना हा निर्णय घेतल्यामुळे परीक्षार्थी संताप व्यक्त करत आहेत. तसेच अचानकपणे ही परीक्षा पुढे ढकलल्यामुळे आता नेमके काय करावे असा प्रश्न परीक्षार्थींना पडला आहे.
सहा हजार दोनशे पदांसाठी परीक्षा
आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील 2739 आणि गट ड संवर्गातील 3466 अशा एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यासाठी राज्यातील 1500 केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार होती. ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत केली जात आहे. उत्तर पत्रिकांची तपासणी संगणक प्रणालीद्वारे केली जाणार आहे.
हा गोंधळ मी पहिल्यांदाच पाहतोय, निर्णय चुकीचा- बच्चू कडू
परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी गंभीर टीका केलीआहे. हा निर्णय चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “चुकीचा निर्णय आहे. हा गोंधळ मी पहिल्यांदाच पाहतोय. वाशिमच्या विद्यार्थ्याला नाशिकचं सेंटर दिलं गेलं. काही अडचण आली तर त्यासाठी 6 नंबर दिले गेले आहेत. ते उचलले जात नाहीत. आतापर्यंत मला 500 पेक्षा जास्त फोन आले आहेत. परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर सांगितलं जातं की परीक्षा रद्द झाली. हे चुकीचं आहे. प्रशासनातील जे दोषी आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,” असा शब्दात बच्चू कडू यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.
विद्यार्थ्यंच्या आयुष्याशी खेळ चालवला आहे का ?
राज्य सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकाला घेरलं आहे. “बच्चू कडू यांनी सत्तेत असतानाही नाराजी व्यक्त करत आहेत. त्यावरुन सरकारचा किती निष्काळजीपणा आहे हे दिसून येतं. सर्वसामान्य कुटुंबातील मुलं हजारो रुपये खर्च करून सेंटरवर जातात, तेव्हा कळतं की परीक्षा नाही. काय विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ लावला आहे काय? अशा प्रकारचा बेजबाबदारपणा माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. विद्यार्थ्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही संताप व्यक्त करा. सरकार दरबारी आमचं गाऱ्हाणं मांडा. कंपनीवर कारवाई करण्यापेक्षा त्या खात्याचा मंत्र्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. तुम्हाला वाटलं की परीक्षा केंद्रं चुकीची टाकणार, तुम्हाला वाटलं ही परीक्षा रद्द करणार. विद्यार्थ्यांचं आयुष्य फुलायच्या काळात तुम्ही त्यांच्यावर असा अन्याय करत आहात. महाविकास आघाडी सरकार या सगळ्या प्रकाराला जबाबदार आहे,” अशी संतप्त प्रक्रिया दरेकर यांनी दिलीय.
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057727440 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
![]()
Table of Contents



