आरोग्य विभाग गट ‘क’ आणि गट ‘ड’ परीक्षा नवीन तारीख!!

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
149

आरोग्य विभागातील रद्द करण्यात आलेल्या भरती परीक्षांच्या तारखांबाबत  निर्णय होणार आहे. मात्र, ज्या कंपनीच्या गोंधळामुळे अचानक परीक्षा रद्द करावी लागली आणि लाखो परीक्षार्थींनी न्यासा या खाजगी कंपनीवर कारवाई करा अशी मागणी करतायत, त्या कंपनीला सरकार बदलणार नाही. त्यामुळे परिक्षेपूर्वीच गोंधळ घालणाऱ्या न्यासा कंपनीकडेच आरोग्य विभागाच्या पदभरतीची जबाबदारी दिली आहे.

आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला होता. तसेच पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा होणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, हीच परीक्षा येत्या 15 -16 किंवा 22-23 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते (maharashtra health department recruitment 2021 exam date announced by rajesh tope said exam will be in october month)

आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी ‘न्यासा’ या खाजगी कंपनीला काम देण्यात आले आहे. मात्र, त्या कंपनीने परीक्षेपूर्वीच मोठा गोंधळ करून ठेवला. हजारो परीक्षार्थीना याची झळ सहन करावी लागली. त्यानंतर आरोग्य विभागाने नियोजित तारखांच्या परीक्षा रद्द करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यात परीक्षा केंद्रावर पोहोचणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर न्यासा या परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. इतकंच नाही तर ही कंपनी ब्लॅक लिस्ट असल्याचेही समोर आले, तसा आरोप हजारो विद्यार्थ्यांनी केला. मात्र, त्या एजन्सीच्या बदलाबाबत कोणताही विचार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील आरोग्य विभागातील गट क आणि गट ड संर्वगातील रिक्त पदे भरण्यासाठी ०६ ऑगस्ट २०२१ ते २२ ऑगस्ट २०२१ आणि गट ड संवर्गातील पदासाठी ०९ ऑगस्ट २०२१ ते २३ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार गट क आणि गट ड संवर्गासाठीची लेखी परीक्षा २५ सप्टेंबर २०२१ आणि २६ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येणार होती. मात्र, तत्पूर्वीच लेखी परिक्षेचे ठिकाण, परीक्षा केंद्र, चुकीच्या हॉल तिकीटवरून मोठा गोंधळ उडाला.

ऐन परीक्षेच्या तोंडावर अनेक परीक्षार्थींना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर आरोग्य विभागाने भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा रद्द झाल्यानंतर आर्थिक झळही विद्यार्थ्यांना बसली. परीक्षेपूर्वीच गोंधळ, परीक्षेत आणि परीक्षेनंतर किती गोंधळ होणार असा प्रश्न परीक्षार्थींना पडलेला आहे. ज्या कंपनीने मोठी चूक केली, त्या कंपनीला सरकार का बदलत नाही असा सवाल लाखो परीक्षार्थी करीत आहेत.

आरोग्य विभागातील भरती परीक्षा पुढे ढकलल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. यामागे सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे कारण देण्यात आलेले आहे. तशा काही तक्रारीसुद्धा समोर आल्या होत्या. काही विद्यार्थ्यांना तर थेट परराज्यातील परीक्षा केंद्र देण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेशपत्र मिळालेले नाही. काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर फोटो, केंद्र आणि वेळ देण्यात आलेला नाही. तसेच दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणं शक्य नाही, अशा काही अडचणी समोर आल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आरोग्य भारती 2021 गट C आणि D साठी २५ आणि २६ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजिय लेखी परीक्षा पुढील सूचनेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम