ब्रेकिंग: देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, अजित पवार उपमुख्यमंत्री!!!

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
130

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

अजित पवार उपमुख्यमंत्री!!!

राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारी घटना आज (शनिवारी) घडली. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज राजभवनात हा शपथविधी पार पडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी पुन्हा एकदा मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. राज्याच्या जनादेशाला नकारात शिवसेनेने दुसरीकडे आघाडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागू झालं. राज्यात अनेक प्रश्न आज उभे आहेत. त्यांच्यामुळे आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. लवकरच आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करू असंही ते म्हणाले.

२४ तारखेपासून कोणीही सरकार बनवू शकलं नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार येत असेल तर रस्ता काढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि आम्ही सरकार स्थापन केलं, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात सकाळी हा सोहळा झाला.

पंतप्रधानांनी केलं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन

‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी हे सरकार काम करेल असा विश्वास मला वाटतो’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी निर्णय- मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांचे आभार मानतो. महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी आम्हाला दिली. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट जनादेश दिला होता. शिवसेनेने युती नाकारून आघाडी करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात किती काळ राष्ट्रपती राजवट लागू राहणार? खिचडी सरकार नको. इतक्या मोठ्य़ा राज्याला स्थिर सरकारची गरज. शरद पवार यांचे आभार मानतो. आमच्याबरोबर येण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. काही दिवसातच मंत्रीमंडळाचा विस्तार होईल. विश्वासदर्शक ठरावात आम्ही आमचं बहुमत सिद्ध करू. आम्ही आमचा दावा राज्यपालांना सादर केला. राष्ट्रपती राजवट मागे घेऊन आमचं सरकार स्थापन झालं आहे. महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ. शेतकऱ्यांवर संकट आहे. त्यांच्या मागे उभे राहू. जनादेश वेगळा होता. शिवसेनेने भाजपऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.”

महाराष्ट्राच्या समस्या सोडवण्यासाठी घेतला निर्णय- उपमुख्यमंत्री अजित पवार

‘निकालाच्या दिवसापासून कोणताही पक्ष सत्तास्थापनेचा दावा करू शकला नाही. महाराष्ट्राला वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलं आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. राज्याला स्थिर सरकार हवं या भूमिकेतून आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे’, असं अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बोलताना सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची पसंती उद्धव ठाकरे यांच्या नावाला होती. काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास तयार आहेत. शिवसेनेच्या आमदारांनीही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट केलं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत यासंदर्भातला प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र आज सकाळी अचानक हा शपथविधी सोहळा झाला आणि सर्वांनाच धक्का बसला.

काल राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची बैठक मुंबईतील नेहरू सेंटर इथे झाली. बैठकीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले, “अजून चर्चा सुरू आहे. आम्ही असं ठरवलं आहे की कोणतीही गोष्ट अनुत्तरित ठेवायची नाही. अनेक मुद्यांवर एकमत झालं आहे. थोडे बारकावे शिल्लक आहेत. मला अर्धवट माहिती द्यायची नाही. एकत्र पत्रकार परिषद घेऊन घोषणा करू.”

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम