सरदार पटेल स्मृतिदिन विशेष

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
308

                १५ डिसेंबर १९५०: सरदार वल्लभभाई पटेल स्मृतिदिन.

                      सरदार वल्लभभाई पटेल यांना देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ‘पोलादी पुरुष’ म्हणून अत्यंत आदराने गौरविले गेले आहे.

                        महात्मा गांधी यांच्या जवळचे सहकारी म्हणून सरदार पटेल स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व वैशिष्टय़पूर्ण होते. चाणक्याची मुत्सद्दी नीती त्यांच्याजवळ होती. त्यांच्याकडे उत्तम संघटनकौशल्य होते. ते खंबीर प्रशासक होते. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरातमधील खेडा जिल्ह्यतील नाडियाड इथे ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. झव्हेरीभाई हे त्यांचे वडील. वडिलांनी १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला होता. त्यामुळे वल्लभभाई यांच्यावर घरीच राजकीय संस्कार झाले होते. पटेल यांच्यामध्ये लहानपणापासूनच नेतृत्वगुण होते. शाळेत असताना एका विद्यार्थ्याला फीच्या मुद्द्यावरून एका शिक्षकांनी अकारण मारहाण केली. पटेल यांनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबून त्या शिक्षकावर कारवाई करण्यास भाग पाडले होते. त्याचबरोबर शालेय साहित्य विक्री करण्यासाठी एक शिक्षक विद्यार्थ्यांवर दबाब आणत असत. पटेल यांनी त्यांच्याविरुद्ध आवाज उठवला. पटेल यांच्या या पवित्र्याने त्या शिक्षकाने आपला व्यवसायच गुंडाळला; पण हेच पटेल आपल्या चांगल्या शिक्षकांबद्दल अत्यंत नम्र होते. देशाच्या उपपंतप्रधानपदी निवडले गेल्यानंतर ते अहमदाबाद येथे आले असताना त्यांचे एक शिक्षक त्यांना भेटायला येणार होते. पटेल यांना हे कळल्यावर ते स्वतःच त्यांना भेटायला निघाले. रस्त्यातच त्यांची गाठ पडली, पटेल यांनी रस्त्यातच त्यांना खाली वाकून नमस्कार केला.

                 सरदार पटेल यांनी ६०० गावांतील हजारो सत्याग्रही शेतकऱ्यांचे आंदोलन अत्यंत निर्धाराने यशस्वी केले. यातूनच सरदार पटेल यांचे नेतृत्व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत उदयास आले. सन १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सरदार पटेल यांनी भाग घेतला म्हणून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना पाच महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. बार्डोलीच्या सत्याग्रहाने त्यांना सरदार ही पदवी दिली.

              १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. देशाच्या राजकारणात आज जी आव्हाने येथील नेत्यासमोर आणि प्रशासनासमोर उभी आहेत, त्यापेक्षा खूप मोठी आव्हाने स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्याकाळच्या नेत्यांसमोर होती. देश स्वतंत्र झाला त्या वेळी इंग्रजांनी हा देश एकसंध राहणार नाही, अशी तजवीज केली होती. इंग्लंडचे माजी पंतप्रधान चर्चिल हे भारतद्वेषी होते. भारताच्या विरुद्ध कट–कारस्थानं करण्यात इंग्लंडच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चिल आघाडीवर होते.भारतातील ५६५ संस्थानांचं स्वतंत्र राज्य असावं अशी चर्चिल यांची योजना होती. त्यांची ही योजना पटेल यांना अस्वस्थ करीत होती. चर्चिल यांच्या योजनेनुसार कॅबिनेट मिशनने १२ मे आणि १६ मे १९४६ रोजी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. पहिल्या घोषणेनुसार जेव्हा ब्रिटिश भारतात एक किंवा दोन सरकारं अस्तित्वात येतील तेव्हा राजसत्तेचा संस्थानांवरचा अधिकार आपोआपच संपेल. या राज्यांनी मांडलिकत्व स्वीकारताना ब्रिटिश राजसत्तेला दिलेले अधिकार त्यांना परत दिले जातील. ही राज्यं नंतर नव्या सरकारबरोबर संघराज्यात सामील होतील किंवा स्वतंत्र राजकीय व्यवस्था निर्माण करतील. यामुळं हे राजे एका रात्रीत स्वतंत्र राजे होतील; ही स्थिती अतिशय धोकादायक आहे हे पटेलांनी तात्काळ ओळखले. १६ मे १९४६ रोजी ब्रिटिशांनी पत्रक काढून या संस्थानांच्या सार्वभौमत्वावर जवळपास शिक्कामोर्तब केलं. या ऐतिहासिक संस्थानांचे पाठबळ मिळवण्यासाठी भारताकडून सरदार वल्लभ भाई पटेल तर पाकिस्तानकडून मोहम्मद अली जिना प्रयत्नशील होते. दरम्यान, काही संस्थान प्रमुखांची भूमिकाही संभ्रमावस्था निर्माण करणारी होती. काही संस्थान प्रमुखांचा कल कधी भारताकडे होता तर कधी पाकिस्तानकडे. मात्र त्यात सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या दृढ आत्मविश्वासाच्या आणि कणखर धोरणांचा अवलंब करून ५६५ संस्थानांचे भारतात विलीन करून घेतले होते.

                भोपाळचा नबाब भारतात विलीन व्हायला तयार नव्हता, त्याला आपल्या राज्याचे स्वतंत्र अस्तित्व राखायचे होते. ते नाहीच जमले, तर पाकिस्तानात विलीन व्हायचे होते, जीना यांच्यानंतर त्याला पाकिस्तानमध्ये मोठे पद मिळवायचे होते. जुनागढ आणि त्रावणकोर; तसेच भोपाळ या राज्यांना जर वेळीच जरब बसली नसती, तर अन्य संस्थानांच्या प्रमुखांना असाच वेळ मिळाला असता. त्यांना त्यांचे मनसुबे साध्य करता आले असते. पटेल यांनी हे सगळ खुबीने टाळले. जुनागढचा प्रश्‍न त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात जाऊ दिला नाही; तसेच तेथे लष्करी कारवाई करून तो भाग भारतात सामील करून घेतला. या कारवाईवेळी पटेल यांनी माऊंटबॅटन यांनादेखील या कारवाईपासून दूर ठेवले.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम