मागील वर्षी जिल्ह्यात राबविण्यात आलेली कोतवाल भरती अखेर रद्द; प्रशासनाचा निर्णय, पुन्हा राबवण्यात येणार प्रक्रिया !
Kotwal Recruitment 2024
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Kotwal Recruitment 2024
मागील वर्षी जिल्ह्यात राबविण्यात आलेली कोतवाल भरती प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली असल्याची घोषणा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी मंगळवारी केली आहे. भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत हायटेक कॉपी प्रकरणसमोर आल्यानंतर प्रशासनाकडून परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला नव्हता. त्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्ह्यातील ६९ जागांसाठी पुन्हा भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय प्रशासनाकडून करण्यात आला आहे. जिल्ह्यात रिक्त असलेल्या कोतवालांच्या ६९ जागांसाठी मागील वर्षी ७ ऑक्टोबरला जालना शहरातील विविध केंद्रांवर परीक्षा पार पडली. तालुकास्तरावरील परीक्षा केंद्र रद्द करून जालना शहरात १९ परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली होती. परंतु, आता संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.
या परीक्षेसाठी ५ हजार ३०६ उमेदवार पात्र होते. यापैकी ४ हजार ९९६ परीक्षार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. परीक्षेदरम्यान कॉपीप्रकरणी समोर आल्यानंतर या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांसह पुणे येथील सायबर क्राईम विभागानेदेखील केला आहे. कॉपी प्रकरण उघड झाल्यानंतर काही परीक्षार्थी आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास लागल्यानंतर परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु, आता संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे
आता पारदर्शकपणे परीक्षा घ्यावी
कोतवाल पदासाठी जाहिरात निघाल्यापासून अभ्यास करत होते. त्यामुळे पेपर सोपा गेला होता. त्यानंतर मी निकालाची प्रतीक्षा करत होते. परंतु, यात गैरप्रकार झाल्याचे प्रसारमाध्यमांतून समजले. त्यामुळे परीक्षेचा निकाल लांबणीवर पडला होता परंतु, आता प्रशासनाने ही भरती रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे स्वागत आहे. मात्र, आता प्रशासनाने पारदर्शकपणे परीक्षा घ्यावी, जेणेकरून पुन्हा अशी वेळ येणार नाही, यासाठी प्रशासनाने पुन्हा नवीन जाहिरात काढू नये.
– कोमल हिवाळे, परीक्षार्थी
उमेदवारांवर अन्याय
तीन महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल लावण्यात प्रशासनाने उशिर लावला. आता भरती प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे उमेदवारांवर अन्याय झाला आहे. आम्ही अभ्यास करून परीक्षा दिलेली आहे. कॉपी प्रकरणातील जे आरोपी आहेत. त्यांना वगळून परीक्षेचा निकाल लावायला पाहिले होता अशी आमची मागणी होती. मागणीचे निवेदन प्रशासनास दिले होते. –
सुभाष खंडागळे, परीक्षार्थी

App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
![]()
Table of Contents



