व्यक्तीविशेष – हुतात्मा बाबू गेनू सैद
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
हुतात्मा बाबू गेनू सैद
आज १२ डिसेंबर हुतात्मा बाबू गेनू सैद यांचा आज पुण्यदिन . परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून निधन झाले .त्यांच्या स्मृती दिना निमित्त आजचा हा विशेष लेख .
जन्म : १९०८(महाळुंगे, तालुका आंबेगाव,पुणे)
मृत्यू : १२ डिसेंबर १९३०(मुंबई)
नोकरी निमित्त मुंबई येथे वास्तव्य. मुंबई येथे गिरणीत कामाला असून उदरनिर्वाह करीत असत. पण मनात स्वातंत्र्याचा ध्यास होता. १९३० साली वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली. पुढे शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्याच्या बंदीची चळवळीत ते सक्रीय झाले.
सारा भारत देश असहकार चळवळीने पटून लागला, परदेशी कापडावर बहिष्कार टाकण्याचे आव्हान आम भारतीय जनतेने स्वीकारल्यानंतर चळवळीने व्यापक स्वरूप धारण केले.
जनतेने स्वातंत्र चळवळीत एक २२ वर्षाचा खेड्यातला तरुण सामील झाला आणि त्याने या स्वातंत्र प्राप्तीच्या कार्यांत स्वतःचे आत्मबलिदान दिले. या २२ वर्षाच्या तरुणाने स्वतःच्या हातातला तिरंगा झेंडा फडकवत, परदेशी कापडाची गाडी घेऊन जाणाऱ्या ट्रकला अडवले.ट्रक पुढे जाऊ देण्यास नकार दिला.
पोलिसांनी या तरुणाला बाजूला होण्यासाठी खडसावले. जबरदस्तीने बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण नाही, हा तरुण बाजूला हटण्यास तयार झाला नाही.
आपल्या हातातील तिरंगा झेंडा फडकवत ‘भारत माता कि जय’ च्या घोषणा देत ट्रकला पुढे जाऊ देण्यास मनाई करत होता. आपल्या ध्येयापासून न हटणाऱ्या या तरुणास पोलीस अधीकारी दरडावत होते, त्याला बाजूला करण्याचा, खेचण्याचा प्रयत्न करत होते; परंतु तो तरुण बाजूला हटण्यास तयार नव्हता.
भारत मातेच्या जय घोषणांचा त्याचा नारा चालू होता. परदेशी माल असणाऱ्या ट्रकच्या समोर ठाणं मांडून उभा राहिलेला ध्येयनिष्ठ तरुण होता बाबू गेनू सैद !
१२ डिसेंबर १९३० रोजी विदेशी कपडे घेऊन एक ट्रक आला. दुकानाकडे जाणारा ट्रक बाबू गेनू यांनी अडवला. पोलिसांनी त्यांना बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला पण बाबू गेनू रस्त्यावरच पडून आडवे झाले. ट्रक पुढे जाऊ देईनात. उद्दाम इंग्रजी ड्रायव्हरने तो ट्रक या २२ वर्षाच्या तरूणाच्या अंगावरून पुढे नेला. बाबुगेनूंना हौतात्म्य पत्करले .
या घटनेनंतर मुंबईत लोकांचा जनक्षोभ उसळला होता. बाबू गेनूंच्या अंत्ययात्रेसाठी हजारो लोक जमा झाले होते. शहराच्या मध्यभागातून अंत्ययात्रा निघाली. बाबू गेनूंवर गिरगाव चौपाटीवर अंत्यसंस्कार व्हावे अशी लोकांची इच्छा होती. या ठिकाणी पूर्वी स्वातंत्र्य चळवळीतील जेष्ठ नेते बाळ गंगाधर टिळक यांच्यावर अंत्यसंस्कार झाले होते. टिळकांसारखं सन्मान बाबू गेनूंना मिळावा अशी लोकांची इच्छा होती. मात्र इंग्रजांनी ही परवानगी नाकारली. तेव्हा लोकांचा राग अनावर झाला. परिणामी ब्रिटीश पोलिस आणि मुंबईतल्या नागरिकांमध्ये चांगल्याच झटापटी झाल्या. नंतर स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी लोकांना समजावले. आणि शेवटी इंग्रजांनी ठरवून दिलेल्या जागेवर बाबू गेनूंवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
१२ डिसेंबर हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो .
हुतात्मा बाबू गेनू सैद यांच्या स्मृती दिना निमित्त विनम्र अभिवादन !!!
![]()



