चालू घडामोडी सराव पेपर – 18 जुलै 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर - 18 जुलै 2020
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर - 18 जुलै 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
3) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
4) तुमचा ईमेल आयडी टाका
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
| Average score |
|
| Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
| Pos. | Name | Entered on | Points | Result |
|---|---|---|---|---|
| Table is loading | ||||
| No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 points______ ही कंपनी अंजी खाड पूल हा भारतातील पहिला तारांच्या सहाय्याने उभारलेला रेल्वे पूल बांधणार आहे
Correct
Incorrect
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (के. आर. सी. एल.) ही कंपनी अंजी खाड पूलहा भारतातील पहिला तारांच्या सहाय्याने उभारलेला रेल्वे पूल बांधणार आहे. हा पूल जम्मू व काश्मीरमधील कटरा आणि रियासी या गावांना जोडणार. हा पूल उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पाचा एक भाग आहे.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या वनाला वन्यजीव अभयारण्य चा दर्जा प्रदान करण्यात आला आहे?
Correct
Incorrect
आसाममधील पोबा या राखीव वनाला वन्यजीव अभयारण्यचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. पोबा वन 10522 हेक्टर भूमीवर पसरलेले आहे
-
Question 3 of 10
3. Question
1 points________ यांनी “द तंगम्स” या शीर्षकाच्या पुस्तकाचे अनावरण केले.
Correct
Incorrect
अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी “द तंगम्स: अॅन इथिनोलिंगविस्टीक स्टडी ऑफ द क्रिटिकली एनडेंजर्ड ग्रुप ऑफ अरुणाचल प्रदेश” या शीर्षकाच्या पुस्तकाचे अनावरण केले.तंगम ही अरुणाचल प्रदेशाच्या अप्पर सियांग जिल्ह्यातील कुगिंग खेड्यात राहणारी आदिवासी जमात आहे. या समुदायाची संस्कृती आणि मूळ भाषा जपण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी राजीव गांधी विद्यापीठ येथील सेंटर फॉर एनडेंजर्ड लँग्वेज आणि हिमालयीन प्रकाशक, नवी दिल्ली यांनी हे पुस्तक प्रकाशित केले.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणती व्यक्ती सुरिनाम देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवडली गेली?
Correct
Incorrect
सुरिनाम देशातले पोलीस प्रमुख असलेले भारतीय वंशाचे चंद्रिकापरसाद ‘चान’ संतोखी यांनी सुरिनाम देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली. मे 2020 महिन्यात झालेल्या निवडणुकीत मिळविलेल्या विजयानंतर संतोखी वर्तमान राष्ट्रपती डेजी बाउटेरस यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहे.सुरीनाम हा दक्षिण अमेरिका उपखंडातील एक देश आहे. सुरीनामच्या पूर्वेला गयाना, पश्चिमेला फ्रेंच गयाना व दक्षिणेला ब्राझील हे देश तर उत्तरेला अटलांटिक महासागर आहे. पारामारिबो ही सुरीनामची राजधानी शहर आहे. सुरिनाम डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे. सुरीनामच्या जवळजवळ 5 लक्ष लोकसंख्येपैकी 37 टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीच्या हस्ते खाद्यान्नावरील प्रक्रियेच्या संदर्भातल्या डिजिटल भारत-इटली व्यवसाय अभियानचे उद्घाटन झाले?
Correct
Incorrect
16 जुलै 2020 रोजी केंद्रीय खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते खाद्यान्नावरील प्रक्रियेच्या संदर्भातल्या डिजिटल भारत-इटली व्यवसाय अभियानचे उद्घाटन झाले. फळे व भाज्या, दूध, तृणधान्ये, दुग्ध, बाटली व वेष्टण निर्मिती हे या अभियानाचे प्रमुख घटक आहेत.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsFIFA विश्व चषक 2022 ही स्पर्धा _____ देशात खेळवली जाणार आहे.
Correct
Incorrect
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने केलेल्या घोषणेप्रमाणे FIFA विश्व चषक 2022 ही स्पर्धा कतार देशात खेळवली जाणार आहे. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा FIFA विश्व चषक अरब प्रदेशात खेळवले जाणार.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या योजनेला वंदे भारत मोहिमेचे नवे रूप म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या सर्वात मोठ्या मोहिमेला म्हणजेच भारत मोहिमेला 7 मे 2020 पासून सुरुवात झाली. यासाठी एअर इंडिया हवाई मार्गे प्रवासी आणण्यासाठी तत्पर आहे तसेच इतर मार्गांनी देखील त्यांना परत आणले जात आहे. आतापर्यंत 70,000 हून अधिक भारतीयांना परत आणले गेले.या मोहिमेच्या नव्या रूपाला एअर बबल या नावाने ओळखले जात आहे, ज्यांच्या अंतर्गत निश्चित केलेल्या एअर बबल क्षेत्रांमध्ये सरकारी हवाई सेवा कंपनीची उड्डाणे पुन्हा सुरू करण्यास भारताने नुकतीच सहमती दिली आहे.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोचीन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीने _____ याची बांधणी करण्यासाठी नॉर्वेच्या ॲस्को मेरीटाईम या कंपनीसोबत करार केला.
Correct
Incorrect
कोचीच्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड या भारतीय जहाजबांधकाने नॉर्वेच्या ॲस्को मेरीटाईम ए.एस. संस्थेसोबत दोन विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित जहाज / बोटी बनविण्यासाठी आणि त्यांचा पुरवठा करण्यासाठी आणि तशाच प्रकारच्या नौका बनविण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हे जगातील पहिले विजेवर चालणारे स्वयंचलित जहाज असणार आहे, ज्याची लांबी 67 मीटर असून त्याची 1846 kWh एवढी बॅटरी क्षमता असणार आहे.विजेवर चालणाऱ्या जहाज बांधणीचा प्रकल्प हा नॉर्वेच्या सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून ओस्लोजवळील समुद्रधुनीतून जाणारा सरकार पुरस्कृत कार्बन-उत्सर्जन रहित परिवहन प्रकल्प आहे. हा प्रकल्प काँगसबर्ग ही स्वयंचलित जहाजांसाठी तंत्रज्ञान पुरविणारी आणि विल्यमसेन ही नौवहन क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी, यांच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेल्या मास्टरली एएस या पहिल्या तंत्रज्ञान व्यवस्थापन आणि स्वयंचलित वाहने बनविणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापनाखाली ही जहाजे चालवली जातील.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणाच्या हस्ते दिल्लीत पाचव्या उड्डयन आणि संरक्षण निर्मिती तंत्रज्ञान परिषदेचे उद्घाटन झाले?
Correct
Incorrect
15 जुलै 2020 रोजी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी आत्मनिर्भर भारत अभियानसह भारताचे सशक्तीकरण या संकल्पनेखाली नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या उड्डयन आणि संरक्षण निर्मिती तंत्रज्ञानपरिषदेचे उद्घाटन केले. तामिळनाडू तंत्रज्ञान विकास व प्रोत्साहन केंद्र (TNTDPC), सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स आणि CII यांनी संयुक्तपणे एका वेबिनारचे आयोजन केले.
-
Question 10 of 10
10. Question
1 points____ या समस्येला तोंड देण्यासाठी भारत आणि इस्रायल या देशांनी एक करार केला.
Correct
Incorrect
सायबर सुरक्षिततेच्या संदर्भात असलेल्या समस्येला तोंड देण्यासाठी संयुक्तपणे सहकार्य वाढविण्याच्या हेतूने भारत आणि इस्रायल या देशांनी एक करार केला.देशांवर झालेल्या सायबर हल्ल्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात 11 व्या क्रमांकावर आहे. भारतातील सायबर हल्ल्यांची संख्या जवळपास 40 लक्ष एवढी आहे.
![]()
Table of Contents



