महाराष्ट्रातील जिल्हे : नागपुर जिल्हा
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
नागपुर
महाराष्ट्राची उपराजधानी
शहरातल्या जुन्या भागातुन ’नाग’ नदी वाहाते, यावरूनच या शहराला नागपुर असे नाव पडले शिवाय या शहरात मोठया प्रमाणात नाग आणि साप निघायचे त्यामुळे देखील शहराचे नाव नागपुर पडले असावे असे देखील म्हंटल्या जातं.!
गोंड राजा बख्त बुलंद शहांनी 1703 साली या शहराची स्थापना केली असे म्हणतात .
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन या शहरात घेतले जाते
देशाच्या मध्य भागात वसलेल्या नागपुर शहरात भारताचा शुन्य मैलाचा दगड आहे.
संत्र्याची मोठी बाजारापेठ प्रसिध्द असुन या संपुर्ण जिल्हयात मोठया प्रमाणावर संत्र्याचे उत्पन्न घेतले जाते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदु परिषदे सारख्या राष्ट्रवादी हिंदू संघटनाचे मुख्यालय हे नागपूर शहरातच आहे .
मुंबई उच्च न्यायालयाचे नागपुर खंडपीठ देखील या ठिकाणी आहे
अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या सरकारी वैज्ञानिक संस्था या ठिकाणी आहेत.
नागपुर शहरात मेट्रो ट्रेन आल्याने आता हे शहर पुर्वीपेक्षा अधिक गतिमान झाले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ महाराष्ट्रातील मोठे विद्यापीठ या ठिकाणी आहे.
व्ही सी ए (विदर्भ क्रिकेट असोसिएशन) हे वर्धा रोड जामठा येथील क्रिकेट स्टेडियम या ठिकाणी असुन भारतातील मोठया स्टेडीयम पैकी एक आहे.
- लोकसंख्या: 46,53,570
- क्षेत्रफळ : 9,892 वर्ग कि.मी.
- साक्षरतेचे प्रमाण : 50%
- लिंग गुणोत्तर: 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 948
- एकुण गावे : 1969
- राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 आणि 7 या जिल्हयातुन गेला आहे.
- ऑरेंजसिटी अर्थात संत्रानगरी अशी ओळख मिळवलेला नागपुर जिल्हा !
- नागपुर हे शहर भारतातील 13 वे आणि जगातील 114 वे सर्वात मोठे शहर म्हणुन ओळखले जाते.
- नुकतच या शहराला देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहराचा पुरस्कार मिळाला.
तालुके : 14
- नागपुर
- नागपुर ग्रामीण
- उमरेड
- कळमेश्वर
- काटोल
- कामठी
- कुही
- नरखेड
- पारशिवणी
- भिवापुर
- मौदा
- रामटेक
- सावनेर
- हिंगणा
पर्यटन आणि तिर्थस्थळं :
दिक्षाभुमी :
दिक्षाभुमी भारतातील बौध्द धर्मीयांचे एक प्रमुख केंद्र आहे या ठिकाणी बौध्द धर्माचे पुनरूत्थान झाले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 रोजी स्वतः बौध्द धर्माची दिक्षा घेतल्या नंतर आपल्या 5 लाखांपेक्षा अधिक अनुयायांना बौध्द धर्माची दिक्षा दिली.त्यानंतर दुस.या दिवशी 15 ऑक्टोबरला 3 लाख अनयायांना बौध्द धर्माची दिक्षा दिली आणि स्वतः देखील पुन्हा दिक्षीत झाले.दरवर्षी या ठिकाणी 25 लाखांपेक्षा अधिक बौध्द अनुयायी येत असतात, महाराष्ट्र सरकार ने दिक्षाभुमी ला ’अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिला आहे.नागपुर शहरातील सर्व धार्मीक आणि पर्यटन स्थळांपैकी हे पहिले असे स्थळ आहे ज्याला ’ए’ क्लास चा दर्जा प्राप्त झाला. दिक्षाभुमी भारतात बौध्द धर्माचे तिर्थस्थळ म्हणुन मानल्या जाते लाखो तिर्थयात्री दरवर्षी दिक्षाभुमीला येतात विशेषतः धम्म चक्र प्रवर्तन दिनाला लाखो अनुयायांचा समुदाय या ठिकाणी येत असतो.
टेकडीचा गणपती :
सिताबर्डी परिसरातील टेकडीचा गणपती नागपुर वासीयांचे आराध्य दैवत आहे.दरवर्षी या ठिकाणी पर्यटक मोठया संख्येने दर्शनाकरता येथे येतात, दर चतुर्थीला तर भाविकांची खुप गर्दी श्री गणेशाच्या दर्शनाकरता येथे होते.येथील श्री गणेशाची ही मुर्ती स्वयंभु असुन जवळपास 200 ते 250 वर्षांपासुन या ठिकाणी ही मुर्ती विराजमान असल्याचे पुरावे मिळतात.संपुर्ण विश्वात ही एकमेव मुर्ती अशी आहे जी पिंपळाच्या झाडातुन निघालेली आहे आणि त्याच ठिकाणी स्थित आहे.
ब्रम्हसुत्रात सांगितल्या प्रमाणे अदस्य मुनींनी त्यांच्या ग्रंथात टेकडी गणेशाचा उल्लेख केलेला असुन तो गणपती हाच असल्याचे सांगितल्या जाते.या ठिकाणी फार पुर्वी मोठी टेकडी होती इंग्रजांनी ज्यावेळेस या ठिकाणी रेल्वे लाईन टाकण्यास सुरूवात केली तेव्हां या टेकडीला तोडण्यात आले तेव्हां पिंपळाच्या झाडात वसलेली ही श्री गणेशाची मुर्ती भाविकांच्या दृष्टीस पडली.इंग्रजांनी देखील या श्री गणेशाची पुजा केली आणि पुढे पुढे भाविकांची या गणेशाप्रती आस्था वाढतच गेली आणि आता तर भाविकांच्या लांबच लांब रांगा नित्य सदोदित येथे पहायला मिळतात.या मंदीरात दर्शनाकरता लाखो भाविक येत असतात पण विशेष म्हणजे प्रसिध्द क्रिकेट प्लेयर सचिन तेंडुलकर जेव्हां ही या शहरात येतात ते आवर्जुन टेकडी गणेशाच्या दर्शनाकरता येथे येतातच.
शिवाय इतर भक्तांकडुन असे देखील म्हंटल्या जाते की सचिन जेव्हां येथे दर्शन घेउन क्रिकेट सामना खेळतात तो सामना भारतिय टिम जिंकते पण जेव्हां दर्शन न घेता खेळतात तो सामना इंडियन टिम हरते.नवसाला पावणारा हा गणेश आणि त्याची महिमा अपरंपार असुन भाविक प्रत्येक शुभकार्य त्याला स्मरूनच करतात.
अंबाझरी तलाव :
11 तलावांपैकी एक आणि शहरातील सर्वात मोठा तलाव म्हणुन याची ओळख आहे आजुबाजुला आंब्याची बरीच झाडे असल्याने आणि या आंब्याच्या झाडांनी वेढलेला हा तलाव म्हणुन याला अंबाझरी तलाव असे नाव पडले.पुर्वी या तलावातुन शहराला पाणी पुरवठा केला जायचा पण आता हे पाणी प्रदुषीत झाल्याने याचा उपयोग केवळ पर्यटनाकरता सिमीत ठेवण्यात आला आहे.नौका विहाराचा आनंद या ठिकाणी घेता येतो. पावसाळयात हा तलाव काठोकाठ भरल्यानंतर वाहायला लागतो तेव्हा या ठिकाणी मोठया प्रमाणात पावसाचा आणि पाण्याचा आनंद घेण्याकरता शहरातील नागरिक एकत्र येतात.अंबाझरी तलावाच्या जवळच एक बाग आहे या ठिकाणी म्युझीकल कारंजे, ईलेक्ट्राॅनिक खेळणी, फिरण्याकरता खेळण्याकरता सोय करण्यात आली आहे त्यामुळे सकाळच्या वेळेस माॅर्निंग वाॅक करणा.यांची आणि सायंकाळच्या वेळेस बालगोपाळांची या ठिकाणी खुप गर्दी असते
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
![]()
Table of Contents



