चालू घडामोडी : ३१ मार्च २०२१
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Current Affairs
चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईट ला रोज भेट द्या.
Visit Regularly our site to check Current Affairs
Current Affairs : 31 March 2021 | चालू घडामोडी : ३१ मार्च २०२१
चालू घडामोडी –
1] कोणत्या जिल्ह्यात ‘श्री अमरनाथ गुहा मंदिर’ आहे?
1) अनंतनाग जिल्हा
2) बारामुल्ला जिल्हा
3) उधमपूर जिल्हा
4) पुंछ जिल्हा
उत्तर :- जम्मू व काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात समुद्रासापाटीपासून 3,888 मीटरच्या उंचीवर ‘श्री अमरनाथ गुहा मंदिर’ आहे.
चालू घडामोडी –
2] ग्रामीण भागासाठी कमी किंमतीची इंटरनेट सेवा विकसित केलेल्या महिला-नेतृत्वाखालील स्टार्टअप कंपनीचे नाव काय आहे?
1) मायरा
2) शटल
3) इनक्रेड
4) एस्ट्रॉम
उत्तर :- बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्था (IISc) समर्थित एस्ट्रॉम या स्टार्टअप कंपनीने ग्रामीण भागासाठी परवडणारे कमी किंमतीची इंटरनेट सेवा विकसित केली आहे. कंपनीने एक वायरलेस उत्पादन तयार केले आहे जे फायबरच्या किंमतीच्या केवळ एक अपूर्णांक किंमतीमध्ये फायबर सारखी बँडविड्थ (गतीमान सेवा) देते. “गीगामेश” असे त्याला नाव देण्यात आले आहे. नवीन उत्पादन ग्रामीण आणि उपनगरी भागात विश्वासार्ह इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात दूरसंचार संचालकांना मदत करेल.
चालू घडामोडी –
3] दुशान्बे हे शहर _____ देशाची राजधानी आहे.
1) किर्गिजस्तान
2) उझबेकिस्तान
3) ताजिकिस्तान
4) तुर्कमेनिस्तान
उत्तर :- दुशान्बे हे शहर ताजिकिस्तान देशाची राजधानी आहे.
ताजिकिस्तानच्या सरकारने दुशान्बे येथे नवव्या “हार्ट ऑफ एशिया – इस्तांबूल प्रोसेस (HoA-IP)” शिखर परिषद आयोजित केली.
चालू घडामोडी –
4] कोणत्या देशासोबत भारताने “धोरणात्मक ऊर्जा भागीदारी” (SEP) याची स्थापना केली आहे?
1) अमेरिका
2) रशिया
3) जर्मनी
4) जपान
उत्तर :- भारताने अमेरिका देशासोबत “धोरणात्मक ऊर्जा भागीदारी” (SEP) याची स्थापना केली आहे. सुधारित भागीदारीच्या अंतर्गत स्वच्छ ऊजेच्या प्रगतीवर आणि हरित ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर भर दिला जाईल.
चालू घडामोडी –
5] कोणत्या राज्याने केंद्र सरकारच्या सहकार्याने 29 मार्च 2021 रोजी दोन वातानुकूलित ‘फिरते वैद्यकीय वाहने’ देशाला समर्पित केले?
1) गुजरात
2) महाराष्ट्र
3) उत्तरप्रदेश
4) मध्यप्रदेश
उत्तर :- 29 मार्च 2021 रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग (महाराष्ट्र) आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान (भारत सरकार) यांनी जालना जिल्ह्यात दोन वातानुकूलित ‘फिरते वैद्यकीय वाहने’ देशाला समर्पित केले.
चालू घडामोडी –
6] कोणत्या कलमाच्या अन्वये राष्ट्रपतीला एखाद्या विधेयकावर मान्यता वा अमान्य करण्याचे अधिकार आहे?
1) कलम 78
2) कलम 126
3) कलम 151
4) कलम 111
उत्तर :- भारतीय संविधानातील कलम 111 याद्वारे राष्ट्रपतीला काही विशेषाधिकार देण्यात आलेले आहे, त्या अन्वये एखाद्या विधेयकाला पूर्ण नकाराधिकार, विलंबनकारी नकार आणि जेबी वेटोपॉकेट वेटो असे स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे.
28 मार्च 2021 रोजी ‘राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (दुरुस्ती) विधेयक 2021’ यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. संसदेच्या मंजूरीनंतर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही यावर शिक्कामोर्तब केल्याने हे विधेयक कायद्यात रुपांतरीत झाले आहे. या विधेयकामुळे दिल्ली सरकार हे नायब राज्यपालांना जबाबदार राहणार आहे. त्यानुसार, दिल्ली विधानसभेत मंजूर केलेल्या कायद्याच्या दृष्टीने “सरकार” याचा अर्थ राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीचे “नायब राज्यपाल” असा होईल आणि शहराच्या सरकारला कोणतेही कार्यकारी पाऊल उचलण्यापूर्वी उपराज्यपालांचा सल्ला घ्यावा लागणार आहे.
चालू घडामोडी –
7] कोणत्या प्रदेशात भारत आणि अमेरिका या देशांची ‘पासएक्स’ नामक नौदल कवायत पार पडली?
1) अटलांटिक महासागर
2) बंगालचा उपसागर
3) पॅसिफिक महासागर
4) अरबी समुद्र
उत्तर :- 28 मार्च आणि 29 मार्च 2021 रोजी भारत आणि अमेरिका या देशांनी बंगालच्या उपसागरात ‘पासएक्स’ नामक नौदल कवायत आयोजित केली होती.
चालू घडामोडी –
8] “एक्झाम वॉरियर्स” या पुस्तकाची नवीन आवृत्ती कोणी लिहिली आहे?
1) अरविंद केजरीवाल
2) रमेश पोखरियाल
3) मनीष सिसोदिया
4) नरेंद्र मोदी
उत्तर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाची नवीन आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. परीक्षेच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांना तणावमुक्त करणे हे पुस्तकाचे उद्दीष्ट आहे.
चालू घडामोडी –
9] भारतीय संविधानाचे कोणते कलम “संसदेची सत्रसमाप्ती” करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देते?
1) कलम 61 (2)(ब)
2) कलम 143 (2)(ब)
3) कलम 85 (2)(ब)
4) कलम 46 (2)(ब)
उत्तर :- “संसदेचे सत्र, सत्रसमाप्ती आणि रद्द” यासंबंधी संविधानिक तरतूद भारतीय संविधानाच्या ‘कलम 85’ यामध्ये करण्यात आली आहे. कलम 85 (2)(ब) अन्वये “संसदेची सत्रसमाप्ती” करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना मिळतो.
चालू घडामोडी –
10] जल जीवन अभियान हा ____ याचा उपक्रम आहे.
1) जल शक्ती मंत्रालय
2) पृथ्वी विज्ञान मंत्रालय
3) पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय
4) पंचायतराज मंत्रालय
उत्तर :- जल जीवन अभियानाचा शुभारंभ 15 ऑगस्ट 2019 रोजी करण्यात आला. या उपक्रमाची अंमलबजावणी जलशक्ती मंत्रालय करीत आहे. केंद्र सरकार या मोहिमेच्या अंतर्गत देशातील सर्व भागात स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचा उद्देश आहे. 2024 सालापर्यंत सर्व घरांना नळाने पाणी देणे हे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. योजनेमार्फत प्रत्येक कुटुंबाला नळाने पाणी पुरविणे, दरडोई 55 लिटर पाणीपुरवठा, शुद्ध पाणी देण्याचा संकल्प, सार्वजनिक नळाद्वारे कुटुंबांना पाणीपुरवठा ही योजनेची वैशिष्ट्ये आहेत.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
![]()
Table of Contents



