महाराष्ट्र : ऊर्जा साधनसंपत्ती

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
950

 

दगडी कोळसा

महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे पूर्व विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांत आढळून येतात .

भूगर्भीय शास्त्राच्या दृष्टीने महाराष्ट्रातील दगडी कोळसा हा गोंडवनी संघाच्या व दामुदा मालेतील बाराकार समुदायातील खडकात आढळतो.

भारताच्या दगडी कोळशाच्या एकूण साठ्यांपैकी सुमारे चार टक्के कोळशाचा साठा महाराष्ट्रात आढळतो.

महाराष्ट्रात तो तीन क्षेत्रांत आढळून येतो

  1. वैनगंगा खोरे
  2. वर्धा खोरे
  3. यवतमाळ व चंद्रपूर ह्या जिल्ह्यांचा सीमावर्ती भाग.

जिल्ह्यानुसार दगडी कोळशाचे वितरण : 

 महाराष्ट्रातील सर्वात मोठे  दगडी कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्यातील  बल्लारपूर तालुक्यात आढळतात.

  1. चंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यात चंद्रपूर व घुग्गुस, राजुरा तालुक्यात सास्ती, वरोरा-भद्रावती तालुक्यांत मांजरी
  2. यवतमाळ :वणी, राजुरा, मारेगाव व उमरखेड
  3. नागपूर : वणी, राजुरा, मारेगाव व उमरखेड

 

औष्णिक विद्युत केंद्र

 महाराष्ट्रात प्रामुख्याने औष्णिक वीज निर्माण केली जाते, ही केंद्रे प्रामुख्याने कोळशाच्या खाणीजवळ किंवा रेल्वे मार्गाजवळ उभारली जातात. याचे कारण असे की, औष्णिक विद्युत निर्मितीसाठी वेळेवर कोळशाचा पुरवठा व्हावा.

कोकणातील औष्णिक विद्युत केंद्रे :

  1. चोला (ठाणे) – मध्य रेल्वेचे कल्याणजवळ उल्हास नदीच्या खाडीजवळ औष्णिक केंद्र आहे. यापासून मुंबई, मुंबई उपनगर, कल्याण, पुणे, मुंबई-कल्याण, इगतपुरी याकरिता विद्युत पुरवठा केला जातो. या केंद्रास झारखंडमधील कोळसा रेल्वे मार्गाने उपलब्ध होतो तर पाणी हे उल्हास नदीने मिळते.
  2. तुर्भे येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र : एकलहरे (नाशिक) – नाशिकजवळील एकलहरे येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. याचा फायदा नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रासाठी झाला आहे.

खान्देशमधील औष्णिक विद्युत केंद्र : फेकरी (भुसावळ), जळगाव जिल्ह्यातील भुसावळजवळ फेकरी येथे हे औष्णिक विद्युत केंद्र आहे.

मराठवाड्यातील औष्णिक विद्युत केंद्र:  परळी (बीड), मराठवाड्यात बीड जिल्ह्यात परळी येथे हे औष्णिक केंद्र उभारले आहे.

विदर्भातील औष्णिक विद्युत केंद्र:  विदर्भात पाच औष्णिक केंद्रे आहेत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे औष्णिक विद्युत केंद्रास लागणारा कोळसा स्थानिक स्तरावर उपलब्ध होतो.

  1.  पारस  : अकोला जिल्ह्यात पारस औष्णिक विद्युत केंद्र आहे.
  2. कोराडी :  महाराष्ट्रातील सर्वांत महत्त्वाचे औष्णिक विद्युत केंद्र नागपूरजवळ कोराडी येथे आहे.
  3. खापरखेडा : नागपूरच्या वायव्येस खापरखेडा हे औष्णिक केंद्र आहे.
  4. दुर्गापूर : चंद्रपूर जिल्ह्यात दुर्गापूर औष्णिक केंद्र आहे.
  5. बल्लारपूर : चंद्रपूरच्या दक्षिणेस बल्लारपूर येथेही औष्णिक विद्युत केंद्र आहे.

जलविद्युत केंद्रे 

कोयना जलविद्युत केंद्र

  • कोयना जलविद्युत केंद्रास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा  असे म्हणतात.
  • महाराष्ट्र राज्याच्या विकासात कोयना जलविद्युत केंद्राचा महत्वाचा वाटा आहे .
  • कृष्णा नदीची उपनदी कोयना असून तिचा उगम महाबळेश्वरमधून होतो. हेळवाकजवळील देशमुखवाडी येथे कोयना नदीवर धरण बांधून पाणी अडवले आहे.
  • या धरणामुळे विस्तृत जलाशय निर्माण झालेला असून, हा जलाशय ‘शिवसागर म्हणून ओळखला जातो.
  •  कोयनेचा चौथा टप्पा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर जगातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्पात कोयनेचे स्थान अग्रेसर राहील .
  • लेक टॅपिंगचा यशस्वी प्रयोग : कोयना जलाशयात लेक टॅपिंगचा यशस्वी प्रयोग १३ मार्च १९९९ रोजी झाला. अत्याधुनिक तंत्रावर आधारित या प्रकारचा हा प्रयोग आशिया खंडात पहिल्यांदा यशस्वी झाला. अशाच प्रकारचा प्रयोग पुन्हा एप्रिल २०१२ मध्ये झाला.

कोकणात रायगड जिल्ह्यात टाटा वीज मंडळाचे भिरा, खोपोली व भिवपुरी येथे जलविद्युत प्रकल्प आहेत.

जायकवाडी पैठण जलविद्युत प्रकल्प : 

  • मराठवाड्यात गोदावरी नदीवर पैठणजवळ धरण बांधलेले आहे. त्याआधारे वीजनिर्मिती करण्यात येते.

येलदरी जलविद्युत प्रकल्प :

  • मराठवाड्यात पूर्णा नदीवर परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात येलदरी गावाजवळ हे धरण बांधले आहे.
  • या प्रकल्पाच्या पायथ्याशी वीज केंद्र आहे
  • . याचा फायदा मराठवाड्यातील परभणी, जिंतूर, हिंगोली इत्यादी भागांतील उद्योगधंद्यांना होतो.

 

खनिज तेल व नैसर्गिक वायू

बॉम्बे हाय :

  • मुंबईजवळ पश्चिमेला अरबी समुद्रात ३ फेब्रुवारी १९७४ ला ‘सागर सम्राटने पहिली विहीर खोदली. या तेल क्षेत्रालाच ‘बॉम्बे हाय म्हणतात. बॉम्बे हाय क्षेत्रात खनिज तेल व नैसर्गिक वायू उपलब्ध होतात.

उरण औष्णिक विद्युत केंद्र :

  • उरण बंदराजवळ नैसर्गिक वायू साठवला जातो व तेथे हे औष्णिक केंद्र आहे.

अणु ऊर्जा :

  • अणु ऊर्जा निर्मितीसाठी युरेनियम, थोरियम, लिथियम व प्लॅटिनम यासारख्या औष्णिक इंधनांचा वापर केला जातो. यापैकी भारतात थोरियमचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात.
  • १० ऑगस्ट १९४८ रोजी भारतीय अणुशक्ती मंडळाची स्थापना करण्यात आली.
  • महाराष्ट्रात मुंबई (तुर्भे) येथे तारापूर औष्णिक केंद्र आहे.

भाभा ऑटोमिक रीसर्च सेंटर (ट्रॉम्बे) :

  • मुंबईला तुर्भे येथे ही संस्था असून या ठिकाणी खालील अणुभट्ट्या आहेत
  • अप्सरा, सायरस, झरलिना, पूर्णिमा-१, पूर्णिमा-२, ध्रुव

 तारापूर अणु केंद्र :

  • ऑक्टोबर १९६९ मध्ये अमेरिकेच्या मदतीने हे अणु केंद्र उभारले.
  • या केंद्रामधून महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना वीजपुरवठा केला जातो.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.